*एक दृष्टिक्षेप, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर*
*एक दृष्टिक्षेप, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर* . जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या भारतात भारतीय राज्यघटनेने सत्तेचे विकेंद्रीकरण स्वीकारलेले. त्या मुळे देशाच्या सत्तेचे केंद्र जरी दिल्ली असले तरी विकेंद्रित संसदीय लोकशाही मुळे राज्य, जिल्हे, तालुके, गाव-गाड्या पासून अगदी वाड्या-वस्ती पर्यंत सत्तेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. मुळात राजकारणाची सर्व सूत्रे ही सत्तेच्या अवतीभोवती फिरत असतात. सत्तेच्या माध्यमातून समाजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून सत्ता ही परिक्रमा जो राजकीय पक्ष सातत्याने पूर्ण करतो तो प्रदीर्घकाळ सत्तेच्या अवतीभोवती राहतो अशी राज्यशास्त्रीय मान्यता आहे.कोणत्याही राज्याच्या राजकीय क्षेत्रात तेथील सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा दीर्घकालीन परिणाम अनुभवता येतो. सत्तासंघर्षाची लढाई जितकी राजकीय डावपेचाने अर्थात साम,दाम, दंड,भेद नितीने अवलंबली जाते तितकीच त्याच्या मुळाशी सैद्धांतिक लढाई ही खोलवर रुजलेली असते हे विसरता कामा नये.मग ते राजकारण संस्थानिकांच्या राजे राजवाडे काळातील असो,ब्रिटिशकालीन असो किंवा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चे लोकशाही गणराज्य स्थापन झ...